Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले





वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी :मनोहरजी गायकवाड

मुंबई (दि. 14 ऑक्टोबर) —

“बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, पण महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे,” असा ठाम उच्चार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी केला.


धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती तर्फे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा विराट मोर्चा आज (14 ऑक्टोबर) काढण्यात आला.


राज्यातील सर्व आंबेडकरी-बौद्ध जनतेने रखरखत्या उन्हात या मोर्चात भव्य शक्तिप्रदर्शन घडविले. या मोर्चात राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले,



> “महाबोधी महाविहारचा प्रश्न हा केवळ धार्मिक नसून सामाजिक सन्मानाचा प्रश्न आहे. बी.टी. ॲक्ट रद्द करून या महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती द्यावेच लागेल. मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे. नामांतर आंदोलनासाठी जसे मोर्चे काढले, तसेच आता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देखील मोर्चा काढला आहे.”


तसेच त्यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत भाष्य करताना म्हटले,


> “प्रा. जोगेंद्र कवाडे आणि मला वाटते की रिपब्लिकन ऐक्य व्हावे, पण काहींना ते नको आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते.”


मोर्चामध्ये पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते विनाचार्य, भदंत हर्षवोधी, आकाश लामा आदी भिक्खू संघ उपस्थित होते.


यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे निमंत्रक आणि प्रमुख नेते —

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, सुरेश माने, सौ. सीमाताई आठवले, सुलेखाताई कुंभारे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार संजय बनसोडे, आमदार बालाजी किणीकर, आमदार संतोष बांगार, अर्जुन डांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.


सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.

या मोर्चात अविनाश महातेकर, देशक खोब्रागडे, चंद्रबोधी पाटील, काकासाहेब खांबलकर, जीत आठवले, जयदीप कवाडे, पप्पू कागदे, आनंद शिंदे, राजू वाघमारे, तानसेन ननावरे, राजा सरवदे, बाबुराव कदम, सागर संसारे, सुनील निर्भवने, अविनाश कांबळे, कुणाल कांबळे, बुद्धभूषण गोटे, सुरेश सावंत, घनश्याम चिरणकर, विलास रूपवते, रवी गरुड, मिलिंद सुर्वे, श्रीकांत भालेराव, दयाळ बहादुर, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments