प्रतिनिधी - शंकर गायकवाड.
किन्हवली विभागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भात खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. ऑनलाईन प्रक्रियेच्या कारणामुळे भात खरेदी काही काळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भात साठवून ठेवावा लागत होता आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
अखेर आज, दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सावरोली सोसायटीचे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सकाळपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून भाताची पोती घेऊन केंद्राबाहेर रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सावरोली येथे मोठे गोडाऊन उपलब्ध असल्याने किन्हवली विभागासह आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांचा भात मोठ्या प्रमाणावर येथे खरेदी केला जातो. केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांच्या मालाला योग्य वेळी बाजारपेठ मिळणार आहे.
भात खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांना भात विक्री करायची आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह केंद्राशी संपर्क साधावा. कोणत्याही अडचणीसाठी संबंधित विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सावरोली भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने किन्हवली विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Post a Comment
0 Comments