Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन.

 


भंडारा, प्रतिनिधी : शंकर गायकवाड 

भंडारा जिल्हा येथे शेतकरी बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मोर्चा काढला. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “शेतकरी वाचला तर देश वाचेल” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या:


पिक कर्जाची लिमिट तात्काळ वाढवावी, जेणेकरून वाढत्या शेतीखर्चाचा सामना करता येईल.


शेतमालाला योग्य बोनस व हमीभाव द्यावा, उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा.


नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस व दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.


वीज, खत व बियाणे वेळेत आणि अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावेत.



शेतकरी बांधवांनी शांततेत आणि संघटित पद्धतीने मोर्चा काढत आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवला. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात व तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी सोडविणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्या तात्काळ मान्य व्हाव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.


शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments